चिपळूण – गुहागर- चिपळूण मार्गावरील मिरजोळी येथे रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती होऊन अपघात होण्याची शक्यता वाढल्याने हे बेकायदेशीर रीत्या केले जाणारे उत्खनन नक्की कोणाच्या आशीर्वादाने होत. आणि प्रशासन का डोळेझाक करत याबाबत सध्या या परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
मिरजोळी येथील रस्त्याच्या कडेला दत्तवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीर रित्या मातीचे उत्खनन गेल्या तीन ते चार महिन्यापासून सुरू आहे. अनेक शासकीय अधिकारी ,महसूल अधिकारी ,आणि लोकप्रतिनिधी या रस्त्यावरून नेहमी जात येत असतात. मात्र त्यांचे लक्ष अद्याप का गेले नाही याबाबत येथील ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यामुळे येथील बेकायदेशीर होणारे उत्खनन त्वरित थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.