रत्नागिरी ; 16 रुग्णवाहिकांचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण

0
90
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कोरोनाच्या काळात रत्नागिरी जिल्हाला रुग्णवाहिकांची खूप गरज होती. ती गरज ओळखून आपण जिल्ह्याला 16 रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आहोत. खरंतर सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वतःची रुग्णवाहीका हवीच. त्यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत असे रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड अनिल परब यांनी आज रुग्णवाहीका लोकार्पण सोहळ्याच्या ऑनलाईन कार्यक्रमात सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी 16 रुग्णवाहिकांचे पालकमंत्री अॅड अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पुढे बोलताना अॅड अनिल परब म्हणाले की, लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काही दिवसात जाहीर करतील. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट अधिक आहे. या पॉझिटिव्हीटी रेटवर लॉकडाऊनचे भवितव्य अवलबून आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणखी काही दिवस लॉकडाउन आवश्यक आहे. आपण अधिक संयम पाळल्यास या महामारीतून आपण बाहेर पडू असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन जीवाची बाजी लावून काम करत आहे. त्या सर्वांचे अनिल परब यांनी कौतुक केले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खनिकर्ममधून रुग्णवाहिका घेणारे राज्यातील पहीले दोन जिल्हे होण्याचा मान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यानी पटकावला. विदर्भातील काही जिल्हे याचे अनुकरण करत असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

आम्ही मागणी केल्यानंतर अॅड अनिल परब यांनी तात्काळ जिल्ह्याला रुग्णवाहिका दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यासाठी सहकार्य करणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि जिल्हा प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. लसीकरणाने वेग घेतला असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार राजन साळवी, जि. प. उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here