बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊन नंतरही रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक बाहेर पडत असल्याने गुहागर पोलिसांनी धडक कारवाई केली. या धडक कारवाईत मध्ये मोटर वाहन कायद्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास 680 केसेस दाखल करण्यात आल्या असून यामध्ये 2 लाख 57 हजार रुपये 200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

गुहागर तालुक्यात एक एप्रिल 2021 पासून 12 मे 2021 पर्यंत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली. यावेळी कोरोना कालावधीत प्रशासनाने कडक नाकाबंदी केली असून याही पुढे अशी धडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते पोलीस कॉन्स्टेबल
राजू कांबळे, वैभव चौगले ही कारवाई केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here