येडगेवाडीसह परीसरातील गावांतील नेटवर्क सुविधांसाठी टाॅवर मंजुर करा- खासदार सुरेश प्रभू

0
148
बातम्या शेअर करा

आरवली – संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी सह राजिवली , रातांबी ,पाचांबे, कुचांबे, कुंभारखाणी, कुटरे, येगांव, मुरडव आदी इतर गावांमध्ये बी.एस.एन.एल मोबाईलला नेटवर्क नसून इतर खाजगी मोबाईल टॉवर कंपन्यांच्या सीमकार्ड धारक कंपन्यांच्या नेटवर्क ला अखेरची घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे राजिवली ग्रामपंचायतीने भारत संचार निगम चे रत्नागिरी महाव्यवस्थापक यांच्याकडे दि. २४ जानेवारी २०१६ रोजी प्रथम येडगेवाडी या ठिकाणी मोबाईल टॉवर ची मागणी केली होती उंचीच्या ठिकाणी असलेल्या येडगेवाडीत मोबाईल टॉवर उभारुन नाॅट रिचेबल गावांना नेटवर्क कक्षेत आणावे ही प्रमुख मागणी आहे २०१६ पासून पाठपुरावा सुरु असताना राजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी ही बाब राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिली सुरेश प्रभू यांनी तातडीने दखल घेत ३ नोव्हेंबर २०२० रोजी केंद्रीय दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्रव्यवहार करत डिजीटल युगात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळांसाठी उपयुक्त असणारी ओएफसी केबल टाकून नवीन मोबाईल टॉवर मंजुर करण्याची मागणी केली होती या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत ११ मे २०२१ रोजी दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना दुसरे संदर्भीय स्मरणपत्र लिहून मागणी लावून धरली आहे..

सध्या जग चंद्र, मंगळ ग्रहांवर स्वारी करत आहे मात्र येथील गावांमध्ये काॅलींगसाठी साधे नेटवर्क मिळत नाही येथील नागरीकांची नेटवर्क अभावी मोठी गैरसोय होत आहे तर तरुण पिढीसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने तरुण वर्ग त्रस्त आहे तरुण वर्गाने संतोष येडगे यांच्याकडे याबद्दल वारंवार नाराजी व्यक्त केली होती स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी मोबाईल टॉवर उभा करणे गरजेचे असून तशी मागणी वारंवार केली जातेय श्री.येडगे यांनी राज्यसभा खासदार यांच्याशी संपर्क करत ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार सुरेश प्रभू यांनी तातडीने केंद्रीय दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे ओएफसी केबल टाकण्यासह मोबाईल टॉवरसाठी शिफारस केली आहे या प्रकरणी तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी येथील जनतेची मागणी आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here