गुहागर – 1 मे महाराष्ट्र दिन रोजी ग्रामसंवाद सरपंच महाराष्ट्र राज्य संघाची स्थापना करण्यात आली होती. काल झुम अँपद्वारे राज्य, मराठवाडा कार्यकारिणीची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. या मध्ये महाराष्ट्रातील नुतन जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आली, तेंव्हा सर्वानुमते गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री. प्रमेय प्रदिप आर्यमाने यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड करत असल्याची घोषणा राज्य अध्यक्ष अजिनाथ धामने यांनी केली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, राज्य सचिव विशाल लांडगे पाटील, मराठवाडा अध्यक्ष किरण घोंगडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घाडगे विदर्भ अध्यक्ष दिगंबर धानोरकर यांच्यासह सहभागी होते. दरम्यान सर्वांनी एकत्र येत सुसंवाद घडावा व सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या अधिकारांची कर्तव्याची माहिती करून देणे जनतेची कामे शासकीय योजना गाव विकासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ग्राम संवाद सरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली असून रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा मान प्रमेय आर्यमाने यांना देण्यात आला. दरम्यान याप्रसंगी निवड करत तसे नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडिबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.