सर्वसामान्यांचा आवाज बना -संजय आवटे

0
87
बातम्या शेअर करा


दापोली -वंचित, सर्वसामान्य, शेतकरी, महिला यांच्या न्याय हक्काविषयी अत्यंत संवेदनशीलतेने लिहिते होण्याची आणि सर्वसामान्यांचा आवाज बनवण्याची आवश्यकता दै. दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली. निमित्त होतं, सम्यक व अॅम्लीफाय चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड येथे झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय कार्यशाळेचे.आयोजन केेलेे होोते.यात
राज्यभरातील निवडक ४० पत्रकार, लेखक, स्तंभलेखक व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पत्रकारीतेचे तेज आणि ओज हे ग्रामीण पत्रकारांनी टिकवून ठेवले आहे. ग्रामीण भागात काम करतांना तो विषय संवेदनशीलतेने हाताळणे, बदल टिपणे, विषयाला जाऊन भिडण्याची तयारी ही येथील बातमीदारांनी दाखवली आहे. पत्रकारितेतील मूल्य हे आत्मभान जागृत ठेवून जपायला हवं. लोकांची लोकांसाठी करावयाची पत्रकारिता हे तत्व जपलं तर येणारा काळा ग्रामीण पत्रकार आणि पत्रकारितेचा असेल हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नसल्याचे मत त्यांनी मांडलं. आज सर्वदूर निराशेचा सूर आळवला जात असताना आणि विषमतावादी व्यवस्था तिच्या कथित लाभार्थ्यांचे देखील नुकसान करीत असताना आत्ममग्न राहणं हे आपल्या कुणालाही परवडणारं नाही. यास्तव अधिक व्यापक लोककल्याणासाठी माणूसपणाच्या वाटा शोधत काम करावे लागेल. अंधार खूप झाला ..पणती जपून ठेवा …असे कवन ऐकवत त्यांनी पत्रकारांनी मधील उत्साह आणि एकूणच कार्यशैली संदर्भाने आत्मविश्वास जागृत केला.
लिंगभाव, समता, पितृसत्ता, स्त्रियांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, पत्रकारिता याविषयीच्या ३६ तासांच्या कार्यशाळेमध्ये सम्यक संस्थेचे कार्यकारी संचालक आनंद पवार, राज्य संपादक संजय आवटे, मुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप, विषय तज्ञ अभ्यासक प्रीतम पोतदार, मुक्त पत्रकार प्रियंका तुपे यांनी मार्गदर्शन केले.
मुंबई व दापोली येथील सहा दिवसीय कार्यशाळेत सहभागी होऊन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पत्रकार स्तंभलेखक यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here