छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्या नसानसात असले पाहिजेत- अरविंद बोडके

0
160
बातम्या शेअर करा

गुहागर – छत्रपती हे नाव ज्यांनी संपुर्ण जगावर अजरामर केले अश्या थोर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात असले पाहिजेत,शिवाजी महाराजांनी चालवलेले प्रशासन आजच्या युगातही अंमलात आले पाहिजे असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी केले. गुहागर तालुक्यातील तळवली डावलवाडी येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

गुहागर पोलीस स्थानकाच्या वतीने तळवली डावलवाडी येथे शिवजयंती आज साजरी करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले की, देशाच्या राष्ट्र पुरुषांना अभिवादन केले गेलेच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले संघटन सर्वांनी आत्मसात केले पाहिजे.शिवरायांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे ही आजच्या काळाची गरज आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मर्यादा असल्याने त्याचे पालन करून अश्या राष्ट्र पुरुषांना अभिवादन करणे गरजेचे आहे.शिवाजी महाराजांचे कार्य एवढे मोठे आहे की लहानथोरांना त्यांच्या कार्याची परिपूर्ण माहिती आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here