ग्रामपंचायत रणसंग्रामला सुरुवात ; रात्रीच्या पार्ट्या जोरात सुरू..

0
291
बातम्या शेअर करा

खेड -ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर गावात पायधूळ न झाडलेले तालुका आणि जिल्हास्तरावरील पुढाऱ्यांचे चेहरे आता गावात दिसू लागले आहेत. काही गावांमध्ये तर रात्री ओल्या पाटर्या झडू लागल्या आहेत. मतदारांना आपलेसे करण्यासाठी काय करावे लागेल याची चाचपणी करण्यास सुरवात झाली असल्याने रात्रीच्या काळोखात दबक्या आवाजातील बैठका सुरु झाल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुक ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम मानली जाते. ज्या पक्षाकडे जास्तीत जास्त ग्रामपंचायती तो पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारतो असा सरळ राजकिय हिशोब आहे. त्यामुळे या निवडणुका ग्रामपंचायतीच्या असल्या तरी निवडणुकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अगदी आमदारांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचाही महत्त्वाचा सहभाग असतो.प्रतिस्पर्धी पॅनेलला शह देण्यासाठी कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार उभा करायचा याचा निर्णय देखील पक्षाच्य वरिष्ठ पातळीवरून घेतला जातो. त्यामुळे अलिकडच्या काळात ग्रामपंचायत निवडणुक गावात होत असली तरी तीची सारी सुत्र तालुक्याच्या ठिकाणाहन हलविली जात असतात.

जिल्ह्यात एकूण 846 ग्रामपंचायती असून, त्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होत आहेत. जिल्ह्यात एकूण प्रभागांची संख्या 1508 असून 1590 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 479 ग्रामपंचायतीमध्ये 3,921 सदस्यपदांसाठी निवडणूक होत आहे. यात मंडणगडमध्ये 15 ग्रामपंचायतीमध्ये 113 सदस्य पदांसाठी 216 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. दापोलीमध्ये 57 ग्रामपंचायतीत 479 सदस्यांसाठी 879 अर्ज, खेडमध्ये 87 ग्रामपंचायती 681 सदस्यापदासाठी 1190 अर्ज, चिपळूण 83 ग्रामपंचायती 693 सदस्य 1223 अर्ज, गुहागर 29 ग्रामपंचायती 239 सदस्य 372 अर्ज, संगमेश्वर 81 ग्रामपंचायती 647 सदस्य 1203 अर्ज, रत्नागिरी 53 ग्रामपंचायती 497 सदस्य 1080 अर्ज, लांजा 23 ग्रामपंचायती 175 सदस्य 337 अर्ज तर राजापूर तालुक्यात 51 ग्रामपंचायतीत 397 सदस्यपदासाठी 783 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यात एकूण 7,283 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.



बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here