नाणार प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिकाही बदलेल:ना.प्रवीण दरेकर

0
162
बातम्या शेअर करा


चिपळूण -नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका देखील बदलेल.त्या दृष्टिकोनातूनच शिवसेनेची हालचाल दिसत आहे.असे स्पष्टमत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

शिवसेनेने कोकणचा भ्रमनिरास केला असून आता नाणार बाबत सकारात्मक भूमिका घेऊन येथील रोजगाराचा प्रश्न सोडवावा असे आवाहन देखील त्यांनी केले.मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते चिपळूण दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका मांडताना राज्यातील आघाडी सरकार तसेच शिवसेनेवर आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच खा.संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू,जिल्हा सरचिटणीस रामदास राणे,शहराध्यक्ष आशिष खातू,माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने,तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ना.दरेकर यावेळी म्हणाले केंद्राने आणलेल्या कृषी विद्येयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणूनबुजून गैरसमज पसरवले जात असून प्रत्यक्षात हा कृषी कायदा शेतकऱ्याच्या हिताचा असल्याचे त्यांनी नमूद केले.महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार असून प्रत्येक क्षेत्रात हे सरकार निष्फळ ठरले आहे.कोकणाकडे तर या सरकारचे अजिबात लक्ष नाही.कोकणात एक ही नवा प्रकल्प या सरकारने आणला नाही.की कोकणाच्या विकासासाठी निधी देखील हे सरकार देऊ शकलेले नाही.कोकणासाठी ५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्या अशी मागणी मी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.परंतु त्यांनी कोकणाबाबत चकार शब्द देखील काढला नाही.
निसर्ग वादळात कोकणाचे प्रचंड नुकसान झाले परंतु अद्यापही ६० टक्के लोकांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.अतिशय तुटपुंजी अशी मदत केली ती देखील वादळग्रस्तांना मिळालेली नाही.हे दुर्दैव असल्याचे दरेकर म्हणाले.मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संशयास्पद असून आरक्षण देता येणार नाही हे लक्षात आल्यावर सरकारने इडब्ल्यूएस चे आरक्षण देऊन सरकार पळ काढत आहे.आशा आरक्षणाचा कोणताही उपयोग मराठा समाजाला होणार नाही.अशी पळवाट काढून सरकार मराठा आरक्षणासाठी शाहिद झालेल्यांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित दादा पवार यांनी मी येईन जाईन या विषयावर बोलूच नये.कारण राजकारणात येणे जाणे ही प्रक्रिया नेहमीच सुरू असते आणि स्वतः अजित दादांनी ते आपल्या भूमिकेने दाखवून देखील दिले आहे.संजय राऊत हे केंद्र आणि राज्य असा वाद तेवत ठेवण्याचा प्रयत्न सतत करत आहेत.ही त्यांची भूमिका दुर्दैवी असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये.असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

सर्व निवडणुका स्वबळावर
या पुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा ना.दरेकर यांनी यावेळी केली.कोकणातील ग्रा.प आणि नगरपालिका स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल.आणि या निवडणुकांमध्ये देखील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here