रत्नागिरी – सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईकडे विमान उड्डाण करण्याचा दिवस आता जवळ आलाय. मागील अनेक वर्षाच्या प्रयत्ना नंतर एव्हिएशन सेक्रेटरी प्रदीप खरोला यांचे पत्र आम्हला आले आहे. विमान उड्डाणाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी कळवले आहे. अलायन्स एअर कंपनी येत्या ४ तारखेला येथे पाहणी करण्यास येणार आहे. इंडिगो हि विमान कंपनी सिंधुदुर्ग वरून मुंबई, दिल्ली हि विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उडान योजनेअंतर्गत हा विमानतळ असल्याने अवघ्या अडीच हजारात सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमानप्रवास करता येणार आहे अशी माहिती रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. ते म्हणाले कि यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सिव्हील एव्हियेशन मिनिस्टर हरदीपसिंग पुरी आणि सुभाष देसाई या तिघांनी सर्व प्रशासनाला आदेश दिले असून २६ जानेवारीपूर्वी सर्व तयारी पूर्ण करा व २६ जानेवारी किंवा त्यापूर्वी या विमान उड्डाणाला सुरुवात करा.