मुंबई – आर्थिक बाबतीत देशातील सर्वात मोठ्या अश्या भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)
मध्ये कामाला लावतो असे सांगून जवळपास 350 व्यक्तीकडून प्रत्येकी हजारो रुपये घेऊन चिपळूण तालुक्यातील कौंढरताम्हाणे येथील मनोज सकपाळ यांच्या सहकार्याने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाल्याने अखेर ठाणे ऐरोली येथील मनीष पेंटरच्या विरोधात रबाळे येथील पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुहागर व चिपळूण तालुक्यातील तरुण युवकांनसह मुंबई , ठाणे येथील जवळपास 350 जणांना 2017 नोव्हेंबर मध्ये बीसीसीआय मध्ये नोकरीची लावण्याची हमी देण्यात आली यावेळी यामध्ये तुम्हाला 35 हजार पगार ,डीए मिळून जवळपास 55 हजार रुपये पगार असेल असे सांगण्यात आले. त्यावेळीच वेळी डिसेंबर 2017 मध्ये 300 पेक्षा जास्त जणांना जणांना बीसीसीआयच्या लेटरपॅडवर जोईनिंग लेटर सुद्धा देण्यात आले त्यामध्ये कामाचे ठिकाण आणि पगार याचा उल्लेख केलेला आहे.
मात्र हे नियुक्ती पत्र देताना प्रत्येक व्यक्तीकडून लाखो रुपये घेण्यात आले व हे पैसे चिपळूण तालुक्यातील कौंढरताम्हाणे येथील मनोज सकपाळ यांच्या मार्फत देण्यात त्यावेळी या सर्व नोकरीची व रुपयांची जबाबदारी मनोज सकपाळ यांनी घेतली होती. मात्र नियुक्ती पत्र दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी काही तांत्रिक अडचण आल्यामुळे तुम्ही जॉइनिंग होऊ नका असा मेल पाठवण्यात आला तोही मेल बीसीसीआयच्या मेलवरून पाठवण्यात आला. त्यानंतर गेली चार वर्ष दहा ते पंधरा दिवसातून बीसीसीआयचे मेलवरून मेल तांत्रिक अडचण आहे असे कारण सांगुन ही भरती टाळली जात आहे. अखेर याबाबत जे उमेदवार फसले गेले आहेत.त्यांनी मनोज सकपाळ यांना संपर्क साधला असता आम्ही तुम्हाला 3 वर्षेच्या पगारासाहित नोकरी ही देणारच आहोत असे सांगण्यात आले अखेर एवढे दिवस होऊन ही आपल्या नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यातील काही जणांनी रबाळे येथील पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.याबाबत रबाळे पोलीस स्टेशनचे अधिकारी चिंतामणी यांनी याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.
याबाबत बीसीसीआयच्या मुंबई येथील ऑफिस मध्ये संपर्क साधल्यावर अशा प्रकारची कोणतीही भरती झालेली नाही असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्या मनीष पेंटर व त्याला सहकार्य करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील कौंढरताम्हाणे येथील मनोज सपकाळ यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची मागणी या सुशिक्षित बेरोजगार यांनी केली आहे.