आंबा घाटातील बेवारस दुचाकी व मोबाईलचे गूढ उकलले….

0
408
बातम्या शेअर करा

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर या महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ सापडलेली बेवारस दुचाकी व त्या पासून काही अंतरावर सापडलेला मोबाईल व बेपत्ता व्यवसायिक यांचे गूढ साखरपा पोलिसांनी उलगडले आहे .

असित सुतरीया राहणार कोल्हापूर हे 24/9/2020 रोजी MH09-DJ 4863 या दुचाकीने सनमाईका मार्केटींगसाठी रत्नागिरीत गेले होते. मात्र लॉक डाऊन काळात व्यवसायात आर्थिक अडचण आल्याने व व्यवसायात मंदी आल्याने आर्थिक संकट वाढले याच नैराश्येतुन कोल्हापूरला परत जात असताना दुचाकी व मोबाईल टाकून त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता.

मात्र त्यातुन आपण जगलो तर आपल्याला मोठी दुखापत होऊन कायमची अपंगत्व येईल त्यामुळे आपल्याला असेच जीवन जगावे लागेल या भीतीपोटी शेवटच्या क्षणी असित सुतरीया यानी निर्णय बदलला व ते आपल्या मूळगावी गुजरातला गेले. बेवारस सापडलेली दुचाकी मोबाईल व बेपत्ता व्यावसायिक याचा शोध कोल्हापूर व साखरपा पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली मात्र चार दिवस झाले तरी हाती काही लागले नाही.

अखेर पोलिसांनी आपली तपासाची मोहीम वेगळ्या दिशेने वळवली. असित सुतरीया याने मुलाकडे दुसऱ्या दिवशी मी सुखरूप असण्याची कल्पना दिली ही बाब कोणाला सांगू नकोस, सांगितलेस तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन असे बजावले होते. हाच धागा पकडून व मिळालेल्या मोबाईल नंबरच्या द्वारे पोलिसांनी त्यांचाशी फोनद्वारें संपर्क साधला. यानंतर मोठ्या शिताफीने त्याच्यापर्यंत पोचुन त्याला सुखरूप आणण्यात यश आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here