नाणार राहणार की जाणार यात कोकणची पाच वर्षे बरबाद झाली-सुहास खंडागळे

0
143
बातम्या शेअर करा

रत्नागिरी:-नाणार च्या नावाने केवळ राजकारण सुरू असून नाणार रद्द करणारेच आता नाणार पाहिजे असे सांगत आहेत,सत्ता असताना नाणार रद्द केला मग आता तोच विषय पुन्हा का?नाणार जाणार की राहणार यात कोकणची पाच वर्षे बरबाद झाली असा घणाघात गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केला आहे.
स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी नाणार चे राजकीय भांडवल केले जात आहे.तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार होते आणि राज्यात ही भाजप सत्तेत होती मग असे असताना आता भाजपचे जे लोक नाणार हवा म्हणून आता भूमिका घेत आहेत त्यांनी नाणार रद्द का केला याचे उत्तर कोकणवासीयांना द्यायला हवे.दुसरीकडे नाणार रद्द झाल्याचे श्रेय घेणाऱ्यांनी सुद्धा स्थानिकांची मागणी असल्यास विचार करू असा संभ्रम निर्माण का करावा असा टोलाही खंडागळे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरून लगावला आहे.नाणार हा विषय आता पूर्णतः राजकीय झाला असून तो कोकणातील तरुणांच्या रोजगाराचा विषय राहिला नाही असेही खंडागळे यांनी म्हटले असून कोकणात तालुकानिहाय ज्या एमआयडीसी आहेत त्याठिकाणी उद्योग व्यवसाय कसे येतील यासाठी त्या त्या भागातील तरुणांनी आपल्या लोकप्रतिनिधी मार्फत पाठपुरावा करायला हवा असे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here