गुहागर – कोरोनाच्या या महामारीत राज्यांमध्ये ऍम्बुलन्सची सुविधा न मिळाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्येही काही तालुक्यांमध्ये ऍम्बुलन्सची सेवा उपलब्ध होत नसल्याने काहीना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून अद्ययावत कार्डियाक ऍम्बुलन्सची खरेदी करण्यात येऊन प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सध्या सुस्थितीत असलेल्या सहा ऍम्बुलन्सची माहिती प्रसिद्ध करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे.