कोल्हापूर – दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वराज्य ग्रुप ट्रस्टच्या माध्यमातून नुकताच सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा स्वराज्य ग्रुपने कोरोनाच्या या महामारीत सुधा या ग्रुपने अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसाच सामाजिक उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात या ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात आला यावेळी शिरोळ तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. तेव्हा स्वराज्य ग्रुप ट्रस्ट शिरोळचे विजय म्हस्के आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.