रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बस सोडण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर आज ठाणे, स्वारगेट, चिंचवड येथून एस. टी. महामंडळाच्या 21 बसेस रत्नागिरी जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी प्रथमच चाकरमानी एसटीने दाखल झाले. यात सर्वाधिक 9 गाडय़ा गुहागर तालुक्यात आल्या. शनिवारी अजून गाडय़ा चाकरमान्यांना घेऊन जिल्हय़ात येण्याची शक्यता आहे. यामध्ये गुहागरमध्ये सर्वाधिक 9 गाडय़ा दाखल झाल्या आहेत. शनिवारी आणखी काही गाडय़ांचे बुकींगही झाले असून चाकरमान्यांच्या संख्येनुसार बसेस सोडले जाणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.