“आजी-आजोबांकडे रहायचं तर गाव सोड!” अल्पवयीन मुलावर या वाडी अध्यक्षांचा दबाव..?

0
420
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील काळसूर कौंढर रामाणेवाडी येथे एका अल्पवयीन मुलाच्या राहण्याच्या वादाने गावात खळबळ उडाली आहे. लहानपणापासून आजी-आजोबांकडे वाढलेल्या मुलाला आई-वडिलांकडे राहण्यासाठी दबाव टाकण्यात आला. एवढेच नव्हे तर “आजी-आजोबांकडे रहायचे असेल तर गाव सोड” असा दम दिल्याचा आरोप वाडी अध्यक्षांवर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन मुलाचा सांभाळ लहानपणापासून त्याच्या सख्ख्या आजी-आजोबांनी केला आहे. त्यामुळे ते त्यांच्याकडेच राहत होते. मात्र, विभक्त राहणाऱ्या आई-वडिलांकडून त्या दोन्ही मुलांना सातत्याने आमच्याकडे राहायला या असा दबाव टाकला जात होता. यामध्ये मुलाला मारहाण करणे, आजी-आजोबांना शिवीगाळ करणे असे प्रकारही घडल्याचे सांगितले जात आहे.
हे प्रकरण गावातील वाडी अध्यक्षांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनीही त्या दोन मुलांना आई-वडिलांकडेच राहण्यास सांगितले. अन्यथा गाव सोडावे लागेल, असा सज्जड दम दिल्याचा आरोप आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर हे प्रकरण गुहागर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले. पोलिसांनी संबंधित सर्व पक्षांना बोलावणे धाडल्यानंतर मात्र वाडी अध्यक्षांनी “या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही” अशी भूमिका घेतल्याचे समोर आले. अखेर संबंधित मुलाने “मी आजी-आजोबांकडेच राहणार” असे गावच्या पोलीस पाटला समोर सांगितल्यानंतर हा वाद तात्पुरता मिटला. या घटनेमुळे ग्रामीण भागातील काही ठिकाणी अजूनही गावपातळीवरील दबाव, अनधिकृत बैठका आणि सामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here