गुहागर – कोकणात शिमगा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि याच उत्सवात देवस्थानाचा विषय करून व त्यावरुन भेदभाव करत एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील झोंबडी तेलेवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी येथील महिला ग्रामपंचायत सदस्या मयुरी महेश लांजेकर यांनी याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
झोंबडी तेलीवाडी येथील मयुरी महेश लांजेकर या आपल्या पती,सासू , व दिरासह एकत्र कुटुंबात राहतात. त्यांच्या घरी पालखी आली असता सुरेश घाग (गुरव) यांनी त्यांना व त्यांच्या सासूबाईंना पालखीची ओटी भरू दिली नाही, पालखीला पाया पडू दिले नाही तसेच त्यांच्या सासऱ्यांचा हातभेटीचा नारळ पालखीत ठेऊ दिला नाही. त्यांना पालखीपासून दूर करत बाजूला केले. यावेळी समीर तावडे व संभाजी लांजेकर यांनी आमच्या घरात पालखी देवू नका, बाजूच्या घरात पालखी ठेवा असे लोकांना सांगितले. या त्यांच्या वागणुकीमुळे माझ्या कुटुंबातील सर्व मंडळींना मानसिक त्रास झाला. त्याचप्रमाणे माझ्या घरातील पुरुष मंडळीना सहाणेवर खूप मानसिक त्रास देऊन भेदभाव केला जात आहे. माझ्या पतीच्या अंगावर मारण्यासाठी धावून जात. असतात. तसेच माझ्या सासऱ्याना तुझ्या सुनेला सदस्य पदाचा राजीनामा दे असा दबाव टाकत आहेत. असे आपल्या दिलेल्या तक्रार अर्जाता नमूद केले आहे. त्यामुळे माझी व माझ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण असून आपण या प्रकरणाबद्दल मला न्याय द्यावा अशी मागणी मयुरी लांजेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक अधिक्षक नितीन बगाटे यांना यांना सुद्धा पत्र देऊन या प्रकरणातून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे
















