आंबा घाटात दरड कोसळली कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक ठप्प

0
95
बातम्या शेअर करा

साखरपा – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दख्खन जवळ आज सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूनी पाच यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

गेले चार पाच दिवस पावसाने रुद्ररूप धारण केल्यामुळे त्यातच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत असल्याने वाहतूकदार धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडी होत आहे.सततच्या पावसामुळे दरड बाजूला हटविण्यास अडथळा येत आहे. तहसीदार व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here