रायगड – गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करुन त्यांचे प्राण वाचविण्याचे काम करत खेड येथील प्रसाद गांधी यांचा महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांच्या वतीने
मृत्युंजय दुत सन्मानपत्र पुरस्कार नुकतेच सन्मानित करण्यात आले.
खेड येथील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी यांना
जखमींना विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, औषधोपचार, अकस्मित मृत्यू प्रसंगी वारस /बेवारस मृतदेहांना इच्छित स्थळी वेळेत पोहोच करून पोलीसांना बहुमोल सहकार्य करीत असल्याबाबत तसेच त्यांनी केलेली ही सेवा ही निष्कामसेवा मृत्युंजय दूत सारखी आहे. त्याचप्रमाणे केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर भावनिक व सामाजिक जबाबदारीने अविरत मदत करत असल्याबाबत प्रसाद गांधी यांनी केलेले कार्य निश्चितच महत्वपूर्ण आहे. या कार्यासाठीत्यांना हा विशेष मृत्युंजय दुत्त पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर आणि पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते. मृत्युंजय दूत बनून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे हे समाजोपयोगी विधायक कार्य यापुढेही निरंतर सुरु राहील असे पुरस्कार प्राप्त प्रसाद गांधी यांनी सांगितले.