वाई – (प्रवीण गाडे ) – सातारा जिल्ह्यात रोजच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी रात्री 119 पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुवारी वाईतील दोघांचा कोरोनामुळे मुर्त्यू झाला जिल्ह्यातील बळींची संख्या 72 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. प्रशासनाने अनलॉक केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. समूह संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला असल्याने आरोग्य यंत्रणा हडबडली आहे. असुन आता 68 जण कोरोना बाधित आल्याने जिल्हा हादरून गेला. जिल्ह्यातील बळींची संख्या 72 तर कोरोनाग्रस्तांची संख्या 2141 झाली आहे. शिरवळ व पुनवडी येथे एकाच दिवशी 30 व 26 असे बाधित सापडल्याने यंत्रणेला धडकी भरली.