गुहागर ; शृंगारतळी येथील गादी कारखान्याला भीषण आग , सुमारे २५ लाखांचे नुकसान

0
144
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गणेशनगर येथील गादीकारखान्याला शाँकसर्कीटने अचानक भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी टळलीअसली तरी अपरिमित असे नुकसान कारखाना मालकाचे झाले.

आरजीपीपीएल कंपनीचाअग्निशमन बंब तब्बल एक तासाने घटनास्थळी आल्याने या दरम्यानच्या कालावधीतगादी सामान बेचिराख होऊन कारखानदाराचे सुमारे २५ लाखाचे नुकसान झाल्याचाअंदाज व्यक्त करण्यात आला आहे.गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत विशेष करुन गादीकारखान्यांना आगी लागण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. यामध्येकाहीसा निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

शृंगारतळीगणेशनगर येथे विरेंद्र उर्फ भाई चौगुले यांचा बरीच वर्षे गादी बनविण्याचाकारखाना आहे. येथे गाद्या तयार करुन त्या शृंगारतळी बाजारपेठेतील दुकानातविक्रीसाठी पाठविल्या जातात. या कारखान्याचे बांधकाम पक्क्या सीमेंटचेआहे. आज गुरुवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास या गादी कारखान्यालाशाँर्कसर्कीटने आग लागली. यावेळी येथे एकमेव असणारा कामगार मशीनवर कामकरत होता. अचानक आग लागल्याने त्याने ती विझविण्याचा प्रयत्न केला मात्र,गादी बनविण्याचा कच्चा माल मोठ्या प्रमाणात असल्याने आग भडकत गेली.त्यामुळे कामगाराने सामान बाहेर काढण्याचे प्रयत्नही केले मात्र, ते शक्यझाले नाही.या आगीत कच्चा मालासह संपूर्ण कारखान्याची इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानीसापडली. परिसरातील वीजजोडण्या बंद करण्यात आल्या. दाभोळच्या आरजीपीपीएलचाअग्निशमन बंबही मागविण्यात आला. मात्र, तो एक तासाने आला. तोपर्यंतसर्वकाही आगीमध्ये बेचिराख झाले होते. ही आग विझविण्यासाठी शृंगारतळीतीलअनेक नागरिकांनी प्रयत्न केले. पाण्याचे फवारणे मारण्यात आले मात्र,कारखाना वाचू शकला नाही. नंतर बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली गेली.घटनास्थळी गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, महसूलचे अधिकारी, मंडलअधिकारी, तलाठी, पोलीस आदी उपस्थित होते.

दरम्यान, गुहागर तालुक्यात कोठेही आगीचे प्रकार घडल्यास आरजीपीपीएलचा बंबमागविण्यात येतो. गुहागर नगरपंचायतीकडे बंब नाही, ही दुदैवाची बाब आहे.विशेष करुन शृंगारतळी ही तालुक्याची आर्थिक राजधानी आहे. मात्र,ग्रामपंचायत अग्निशमन यंत्रणा राबविण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेगुहागर नगरपंचायतीने याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे होते. मात्र,आजपर्यंत नगरपंचायतीनेही अग्निशमन बंबासाठी उदासीनता दाखविल्याचे यावरुनस्पष्ट होत आहे.

विमा उतरविणे आवश्यकशृंगारतळीतील लहान-मोठ्या कारखानदारांनी विमा उतरविणे आवश्यक आहे. तरचत्यांना नुकसानभरपाई मिळू शकते. बहुसंख्य कारखानदारांनी ही बाबगांभीर्याने घ्यावी. अग्निशमन बंब खरेदी करणे ग्रामपंचायतीलाआर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. मात्र, आगी लागू नयेत म्हणून सर्वतोपरीकाळजी घेणे क्रमप्राप्त आहे.-संजय पवार, सरपंच पाटपन्हाळे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here