गुहागर – गुहागर तालुक्यातील शांताई रिसॉर्ट मध्ये आज पासून मिसळ महोत्सव सुरू झाला. भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत या मिसळ महोत्सवाला सुरुवात झाली.

प्रत्येकाला काही ना काही तरी खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते. मग हेच खाद्यपदार्थ शोधत आपण अनेक ठिकाणी भ्रमंती करत असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपला आवडता पदार्थ मनसोक्त खाऊन तृप्त होत असतो…. मात्र असाच जो पदार्थ तो सगळ्यांना आवडतो त्याच पदार्थाचे विविध प्रकार जर तुम्हाला एकाच ठिकाणी खायला मिळाले तर कसं…… होय असाच एक मिसळ महोत्सव आज पासून गुहागर तालुक्यात शांताई रिसॉर्ट मध्ये सुरू झाला आहे. हा महोत्सव 30 ऑक्टोबर पर्यंत सुरू होणार आहे.
शांताई रिसॉर्टच्या निसर्गसौंदर्य परीसरात हा मिसळ महोत्सव सुरू असून सकाळी दहा ते संध्याकाळी दहा या वेळेत आपल्याला या महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
या मिसळ महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत शहरातील प्रसिद्ध मिसळची चव आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे. या मिसळ महोत्सवाचा आयोजन केले शांताई रिसॉर्टचे मालक सिद्धेश खानविलकर व प्रसिद्ध शेफ निलेश लिमये यांनी केले.
या महोत्सवात कोल्हापुरी झटका पुणेरी किरकट, नाशिकचा फटका, नागपूरची तरी, सिन्नरचा खटका आणि शांताई स्पेशल अशा मिसळ आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
सकाळी मिसळ महोत्सवाला सुरुवात होतात गुहागरचे आमदार भास्कर जाधव , विक्रांत जाधव, निलेश मोरे भगवान कदम, अमित कदम सुभाष जाधव , नासिम मालाणी , नदीम मालाणी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या मिसळ महोत्सवात महिलांसाठी एक विशेष अशी पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी शांताई रिसॉर्टने उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी एक कुपन ठेवण्यात येईल आणि त्या कुपनची सोडत रोज रात्री दहा वाजता केली जाईल. यावेळी विजेत्या व्यक्तीचे नाव जाहीर केले जाईल. तरी गुहागर मधील तमाम खाद्य प्रेमी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आव्हान सिद्धेश खानविलकर यांनी केले आहे.