समाजसेवेची ओढ असणारा गुहागर तालुक्यातील मुंढर गावचा सुपुत्र यशाच्या शिखरावर पोहचून देखील आपल्या मूळ गावाशी नाळ जोडून ठेवणारे हाताच्या बोटावरच पाहायला मिळतात. मुंढर गावातले प्रमोद गांधी हे त्याला अपवाद ठरत असून मातीशी घट्ट नातं असेल तर जगाच्या कुठल्याही भागात गेलात तरी आपण आपल्या मातीशी, तिथल्या माणसाशी कसे जोडून राहू शकतो हे प्रमोद गांधी यांनी कृती मधून दाखवून दिलंय…………….

मूळचे गुहागर मधील मुंढर (शिरबारवाडी ) येथील रहिवासी असलेले प्रमोद गांधी यांचं बालपण गावीच गेलं,शालेय जीवनापासून नेतृत्व गुण तसेच उद्योग क्षेत्राची ओढ असलेले प्रमोद गांधी उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेल्या नंतर पदवी प्राप्त करत मुंबईतील अंधेरी भागात स्वतःचा व्यवसाय सुरु करत उद्योग क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलं. कठोर परिश्रम, अफाट जिद्द आणि चिकाटीमुळे प्रमोद गांधी यांनी अल्पवाधित उद्योग क्षेत्रात साजेशी उंची गाठली. मात्र या सगळ्या स्पर्धेत असून सुद्धा दरम्याच्या काळात प्रमोद गांधी हे आपल्या गावासोबत नेहमीच जोडलेले होते. गावातील प्रत्येक लहान – मोठ्या उपक्रमात प्रमोद गांधी यांचा सक्रिय पाठिंबा आणि समाजातील दुर्बल दुर्लक्षित घटकाला आवश्यक असलेली मदत मिळावी यासाठीची त्यांची तळमळ लक्षणीय होती.

प्रमोद गांधी हे मुंबई असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये कार्यरत आहेत मात्र असे असले तरी गांधी यांचा ग्रामीण भागात सामाजिक कार्याचा झंजवात एवढा मोठा होता की त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाच्या वरिष्ठानी प्रमोद गांधी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुका संपर्क प्रमुखपदी त्यांची निवड केली. निवड होण्यापूर्वी देखील गुहागर मधील अनेक गावांमधील मूलभूत प्रश्न प्रमोद गांधी यांनी स्थानिक तरुण आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन वयक्तिक पातळीवर अगदी सहजपणे सोडवलेत.
गुहागर तालुक्यात त्यांनी शालेय उपक्रमात देखील भरीव कामगिरी करत तालुक्यातल्या शाळांना सॅनिटरी नॅपकिन मशिन्स, सॅनिटरी नॅपकिन पॅड disposel मशिन्स यांसह अनेक शाळांना शालेय उपयोगी वस्तूंचा पुरवठा वयक्तिक स्तरावर केलाय.

आगामी काळात गुहागर मधील स्थानिक तरुणांना चांगल्या पगाराचे रोजगार तालुक्यातच मिळावेत यासाठी गुहागर मध्ये अद्योगिक वसाहती याव्यात यासाठी मनसेच्या माध्यमातून सनदशील मार्गाने शासन स्तरावर प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सोबतच ग्रामीण पर्यंटला अच्छे दिन यावेत यासाठीही स्थानिक व्यावसायिक यांना सोबत घेऊन प्रयत्नशील राहणार असल्याचा संकल्प देखील केलाय. समाजातील, विशेषतः गुहागर मधील नागरिकांच्या समस्या नजरे समोर घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार देखील प्रमोद गांधी यांनी केलाय.

मुंबईमध्ये राहून सुद्धा ग्रामीण भागात काम करण्याची आवड असणारे गांधी यांनी 2021 मध्ये चिपळूणमध्ये ज्यावेळेला महापूर आला त्यावेळेला सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना जमेल ती मदत कीटच्या माध्यमातून करत कुठेही प्रसिद्धीच्या झोतात न राहता ते काम पार पडले. तसेच तालुक्यातील अनेक गावात तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सध्या ते काम करत असून नवतरुण युवकांनी मुंबई ,ठाणे या ठिकाणी न जाता गावच्या ठिकाणीच रोजगार कसे मिळेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
