बातम्या शेअर करा

गुहागर – मार्च महिना सुरू झाला की या वाडीत गेली काही वर्ष सलग पाण्याचा तुटवडा अनेक ठिकाणी जाणवतो तर .काही ठिकाणी तर टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे. हीच परिस्थिती कायम असते यावर कायम उपाय काढण्यासाठी गावातील एका वाडी मध्ये वाहणारा झरा यांचा उपयोग करून असगोली येथील एकता वर्धक मंडळाने वाया जाणार्‍या पाण्याला वाडीतील प्रत्येक घरात असलेल्या नळांना घरपोच पाणी दिलं आहे.

गुहागर तालुक्यातील डोंगर-दर्‍यांमध्ये वसलेल्या असगोली येथील वरचीवाडी येथील एकता वर्धक मंडळाने वाया जाणार्‍या पाण्याला वाडीतील प्रत्येक घरात असलेल्या नळांना घरपोच पाणी दिलं आहे. याच वरचीवाडीला लागून असलेल्या जंगलामध्ये पूर्वापार लाभलेला नैसर्गिक झरा आहे.त्याला पाउस सुरू झाला की मोठ्या प्रमाणात पाणी मिळते.त्याचा उपयोग या मंडळाने पाइप टाकून वाडीपर्यंत पाणी अाणले आहे.वाडीच्या मध्यभागी दोन हौद बांधून जनावरांसाठी व वाडीतील लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.बाकीचे पाणी साधारण फेब्रुवारीपर्यंत वायाच जात असे.शिवाय येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचे पाणी न आल्यास या पाण्याचा मोठा आधार असे.परंतु सदर पाणी वाडीच्या सुरवातीला असल्यामुळे डोकीवरून वाहून न्यावे लागत असे.सदर पाणी वाया जात असल्याने शिवाय डोक्यावरून वाहून न्यावे लागत असल्याने या पाण्याला प्रत्येकाच्या घरातील नळाला कस पोहोचविता येइल व त्याचा योग्य उपयोग कसा करता येइल यावर येथील ग्रामस्थ विचार करू लागले यावेळी या मंडळाने पुढाकार घेत सर्व खर्च करत
हे पाणी घरा घरात पोहचवले.
.मग स्थानिक आणि गावी आलेले चाकरमानी यांनी स्वत: अंगमेहनत घेउन रवी जोशी व सचिन पवार यांच्या सहकार्याने नळपाणी कनेक्शन जोडण्यात आले.त्याचे नुकतेच मंडळाचे सुदाम घुमे यांच्या हस्ते उद्धाटनही करण्यात आले.त्यावेळी एकता वर्धक मंडळाचे स्थानिक अध्यक्ष प्रदिप घुमे,मुंबई अध्यक्ष संदिप घुमे तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here