मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट ,ठेकेदार मालामाल, प्रवाशी बेहाल

0
162
बातम्या शेअर करा

खेड – मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांना आळा घालण्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले मात्र ठेकेदार कंपन्यांनी कामाचा दर्जा न राखल्याने पहिल्याच पावसात काँक्रीटीकरण झालेला रस्ता ठिकठिकाणी खचला आणि कामाचा दर्जा उघड झाला.

पहिल्याच पावसात महामार्ग चौपदरीकरणाची झालेली दुरवस्था पाहता ठेकेदार कंपन्या मालामाल तर प्रवाशी बेहाल अशी परिस्थिती आहे. कामाचा दर्जा न राखला गेल्यास ठेकेदाराला बुलडोझरखाली दिले जाईल असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर सभेत केले होते. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा दर्जा पाहता गडकरी साहेब आता आपला शब्द खरा करण्याची वेळ आली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये कोकणात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा विचार करून रस्त्याचे काम करण्याच्या ठेकेदार कंपन्यांनी कामाचा दर्जा राखावयला हवा होता मात्र कोकणात विशेष करून खेड आणि चिपळूण मध्ये काम करण्यात ठेकेदार कंपन्यांनी तो विचार न करता घाई-गडबडीत चौपदरीकरणाचे काम केल्याने पहिल्याच पावसात चौपदरीकरणाचे तीन-तेरा वाजले. चौपदरीकरणाचे होणारे काम दर्जेदार होते कि नाही हे पाहण्याची जबाबदारी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर होती मात्र ठेकेदार कंपन्यांनी या अधिकाऱ्यांनाच मॅनेज केल्याने रस्त्याच्या कामाकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आणि ठेकेदार कंपन्यांचे फावले असे दुर्दैवाने म्हणाले लागते आहे. चिपळूण तालुक्यातील कामथे घाटातील काम सुरु असताना तेथिल ग्रामस्थानी कामाच्या दर्जावर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. चौपदरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या वाळूमध्ये माती मिक्स केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ठेकेदार कंपनीला हे काम थांबिण्याचे आदेश द्यावेत अशी विंनतीही संबधीत यंत्रणेला करण्यात आली होती मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे संबधीत यंत्रणेने दुर्लक्ष केले, आणि त्याचे परिणाम पहिल्याच पावसात दिसू लागले. पहिल्याच पावसात या घाटातील रस्त्याला मोठमोठया भेगा पडल्या आणि हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. खेड तालुक्यात देखील कामाचा दर्जा फारसा वेगळा नाही. कशेडी पायथा ते परशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटरच्या रस्त्याला कुठेही लेव्हल नाही ज्या ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी वाहने इतकी जोरात आदळत आहेत कि अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी रस्ता खचला आहे तर काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. दाभीळ फाटा येथील उड्डाण पुलाची अवस्था अतिशय दयनीय आहे. एक दोन ठिकाणी रस्ता खचला आहे तर पुलावर ठिकठिकाणी भेगा देखील पडल्या आहेत. या पुलावरून वाहने चालविणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखे आहे मात्र इलाज नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून दाभीळ पुलावरून प्रवास करावा लागतो आहे. महामार्ग चौईपाद्रीकरणाचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने या रस्त्याची सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यातल्या त्रूटी दुर कराव्यात आणि चांगला रस्ता करून त्यावरून आमचा प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहेकोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याला पहिल्याच पावसात भेगा पडत असतील तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here