भाग -01
चिपळूण – सांगा सर्वसामान्यांनी जगायचं कसं ? कारण याच सर्वसामान्यांचे पैसे जेव्हा सरकारी कर्मचारी लाटतात….. त्यावेळेला त्यांचं जगणंही असाह्य होत… असाच काहीसा प्रकार रत्नागिरी जिल्यातील सामाजिक वनीकरण चिपळूण विभागाच्या अधिकाऱ्याने केल्याने एका सर्वसामान्य कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे.
चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून वनविभागामार्फत 33 कोटी वृक्ष लागवड ही मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत शासनाच्या सर्वच खात्यांना वृक्ष लागवडीच टार्गेट देण्यात आल होत.त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला प्रत्येकी 3200 रोपे लावण्यास सांगितलं होतं व ही रोप सामाजिक वनीकरण विभागाकडून वाहतूक करून ग्रामपंचायतीमध्ये आणून देण्याचे ठरले होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग चिपळूण यांच्यावतीने प्रथमेश जामसुतकर यांनी चिपळूण तालुक्यातील 42 ग्रामपंचायत मध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे वाटप करण्याचं काम देण्यात आलं होतं. या व्यक्तीने त्यावेळेला सामाजिक वनीकरण विभागाचे काम मिळाले असल्याने व हे काम शासनाचे असल्याने आपले पैसे कुठेही बुडणार नाहीत हाच विश्वास ठेवत सामाजिक वनीकरण विभागाने जी रोप वाटप करण्याचे काम दिलं होतं ते 42 ग्रामपंचायतीला रोप वाटप करण्याचे काम पूर्ण केलं.त्यानंतर प्रथमेश यांनी 42 ग्रामपंचायतींना एक लाख 34 हजार 400 रोपे वहातुक केली. त्यांचे वाहतुकीचे बील 3 लाख 36 हजार झाले आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळावा यासाठी त्यांनी तात्कालीन सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल बनसोडे यांच्याकडे रोपवाटिकेच्या बिलाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी काही बिल दिले तर उरलेले 1 लाख 82 हजार रु बील आपण निधी आल्यावर देऊ असे सांगीतले.
काही महिन्यांनी पुन्हा प्रथमेश यांनी सामाजिक वनीकरण विभाग चिपळूण यांच्याकडे संपर्क साधला व आपले राहिलेले बिल मागितले मात्र त्यावेळी आपल्याकडे निधी नाही ज्या वेळेला निधी येईल त्या वेळेला आपण तुमचं बिल काढू असं सांगण्यात आलं. त्यानंतर जवळपास एक वर्षांनी पुन्हा वनक्षेत्रपाल बनसोडे यांच्या जागी आलेल्या वनक्षेत्रपाल पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रथमेश जामसुतकर यांना असं उत्तर दिलं की मी या ठिकाणी नवीन आलेला आहे.जुन्या गोष्टी मला विचारू नका जे काय बोलायचं असेल ते माझ्या वरिष्ठानशी बोलून घ्या त्यांच्या सांगण्याप्रमाणे प्रथमेश यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी अजब उत्तर दिल्याचे सांगितलं सदर तुमच्या या प्रकरणांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. आणि तुमचे पैसे मिळतील की नाही हेही मला माहित नाही असे उत्तर दिले.
आज या गोष्टीला जवळपास चार वर्षे होत आली तरी आम्ही जी रोपे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाऊन दिली त्याचे वाहतुकीचे बिल आम्हाला मिळाले नसल्याची खंत आणि चीड प्रथमेश जामसुतकर यांनी बोलून दाखवली.
चार वर्षांपूर्वी केलेल्या कामाचे पैसे जर मिळत नसतील तर खरंच सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी यांना चार वर्षात निधी आलेला आहे की नाही ? याची माहिती मिळणं आता सर्वसामान्यांना जरुरीच वाटते. कारण सामाजिक वनीकरण विभाग गेल्या चार वर्षात ठिकठिकाणी वृक्ष लागवडीचे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्या उपक्रमासाठी जर निधी येत असेल तर या गरीब कुटुंबातील व्यक्तीचे बिल देण्यासाठी सुद्धा निधी आलेला असेल अशी चर्चा आता सर्वसामान्य व्यक्तींमधून केली जाते.