कोकणातील हा घाट वाहतुकीसाठी तसेच पर्यटकांसाठी बंद…..

0
116
बातम्या शेअर करा

खेड – (प्रसाद गांधी )-कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा व खेड तालुक्यापासुन 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट (मिनी महाबळेश्वर) वाहतुकीसाठी व पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे.

खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे. या घाटामध्ये खेड तालुक्यातील नागरिक तसेच बाहेरील नागरिक पर्यटनासाठी जात असतात. परंतु सदर घाटाचा रस्ता हा गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला असून घाटामध्ये वाहनांचा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच काही नागरीक हे घाटामध्ये मद्यप्राशन करतात त्यामुळे तिथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे याबाबत असे पत्र खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी खोपी ग्रामपंचायत सह इतर ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहे,


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here