गुहागर – गुहागर आगारातून सुरू केलेली गुहागर- तुळजापूर ही गाडी 24 तास होण्याआधीच बंद करण्याचे आदेश रत्नागिरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने हे एसटीचे अधिकारी एसटीचे उत्पन्न वाढीसाठी नक्की काय करणार व कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. की कर्नाटक गाड्यांच्या उत्पन्नवाढीसाठी झटनार का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय
गुहागर आगारातून कालपासून गुहागर – तुळजापूर ही रातराणी बस सुरू करण्यात आली होती मात्र 24 तास होण्याआधीच गुहागर- तुळजापुर ही बस रत्नागिरीचे एसटीचे सहाय्यक वाहतूक अधिकारी यांच्या आदेशाने आजपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ही बस का बंद करण्यात आली ? नक्की कोणाच्या आदेशाने बंद करण्यात आली? अशा प्रकारची चर्चा कर्मचाऱ्यांचा सुरू आहे.
गुहागर- तुळजापूर ही बस चिपळूण मधून रात्री आठ वाजता सुटते या आधी म्हणजे सात वाजता कर्नाटक राज्याची बस सुटते आणि आठ वाजता पुन्हा एकदा कर्नाटक राज्याची बस सुटते या दोन्ही बस उत्पन्न वाडीत कमी पडतील म्हणूनच ही बस बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे एसटीचे कर्मचारी खासगीत सांगतात. कारण याच बसच्या चालक व वाहक यांच्याकडून काही एसटी अधिकाऱ्यांना आर्थिक मलिदा मिळतो असा आरोपही एसटी कर्मचारी करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटीचे अधिकारी हे कोणाची बस चालवण्यासाठी उत्सुक आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे.
याबाबत रत्नागिरी येथील सहाय्यक वाहतूक अधिकारी जाधव यांना संपर्क साधला असता ही बस आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता चालू केली होती. त्यामुळे आम्ही बंद करण्यास सांगितले असे सांगितले. तर रत्नागिरीचे विभागिय वाहतूक अधिकारी आहेत. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला ही बस सुरू कधी झाली आणि बंद कोणी केली याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे नक्की पाणी मूर्तये कुठे ?असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तर अधिक माहिती घेतली असता चिपळूण आगारातील डेपो मॅनेजर यांनी या गाडीला विरोध केला असही कळत आहे. जर कर्नाटक आगाराच्या दोन गाड्या त्यावेळेला चालत असतील तर महाराष्ट्राची गाडी का चालत नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. असा आरोप कर्मचारी करत आहेत.
एसटी कर्मचारी गेल्या सहा महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप होता. तो संप मिटून एसटीचे कर्मचारी कामावर हजर झाले. आता एसटी कर्मचारी एसटीचे उत्पन्न वाढीसाठी झटत असताना अधिकारी मात्र अशाप्रकारे कर्मचाऱ्यांची गाडी बंद करून गळचेपी करत असतील तर एसटीचे अधिकारी नक्की कुणाचे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर आठ वाजता सुटणारी महाराष्ट्र शासनाची एसटी गाडी बंद करण्यात येते तर सात वाजता सुटणारी व आठ वाजता सुटणारी कर्नाटक राज्याची गाडी बंद करावी अशी मागणी कर्मचारी करत आहेत.