सावधान ; या पतसंस्थेत सचिवाचा आणि संस्थाचालकांचा अनागोंदी कारभार गुंतवणूक असुरक्षित..?

0
1450
बातम्या शेअर करा

चिपळूण -(विशेष प्रतिनिधी )- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे असलेल्या एका पतसंस्थेचे व्यवहार सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याची चर्चा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आहे. अनियमित व्यवहार करणाऱ्या या संस्थेतून मर्जीतील लोकांना कोट्यवधींच्या कर्जाचे वाटप विनातारण केले गेल्यामुळे संस्थेतील संचालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे…..कुठलेही कर्जप्रकरण करताना किमान संचालकांच्या कानावर घालणे बंधनकारक असते मात्र या संस्थेत संस्थाचालक आणि सचिव सोडून पतसंस्थेतील व्यवहार कोणालाच कळत नाही,त्यामुळे अनेक संचालक नाराज असल्याचेही कळतंय….यातील काही संचालक तर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशीही माहिती समोर आली आहे.त्यामुळे तुम्ही केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे का ? हे एकदा गुरू किंवा माऊली ला विचारून तपासून घेणं गरजेचे आहे.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे अतिशय नावाजलेल्या असं छोटेसे गाव याच गावातील एका संस्थेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संस्थेत कर्जप्रकरण केल्यास संबधित कर्जदाराकडून इमारत बांधणीच्या नावाखाली 2 हजार रुपये वसूल करते….अश्या स्वरूपात कोट्यवधी रुपये संस्थेने जमा केले असून या संस्थेची कुठेही इमारत नसल्याची विश्वसनिय माहिती प्राप्त झाली आहे. तर दुसरीकडे व्याज दर देखील संशयास्पद असून त्यातून ग्राहकांची लूट होत असल्याची तक्रार आहे.
संस्थेच्या गैरव्यवहाराची माहिती येथील पत्रकारांकडे पोचल्याचे लक्षात येताच संस्था चालक आणि सचिवांची धावपळ सुरू झाली असून विनातारन कर्ज दिलेल्या लोकांकडे पेपर्स जमा करण्याची प्रक्रिया केली असून संस्थेच्या गैरव्यवहारातून कोट्यवधींची माया जमा करणाऱ्या संस्था चालक आणि सचिवांच्या पायाखालची वाळू सरकली आहे…….त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एक पतसंस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर तर नाही ना असा सवाल आता निर्माण झाला आहे. तेव्हा नागरिकांनी जागे व्हा आणि आपण जर अशा कुठल्या पतसंस्थेत पैसे ठेवले असतील तर आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही ते कळवा आपले पैसे जर सुरक्षित नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here