चिपळूण:-‘केल्याने होत असते आधी प्रयत्न तर केले पाहिजे’..याची प्रचिती तोंडली पिलवली येथे आली आहे.ग्रामस्थांनी संकल्प केला आणि तोंडली शिवणे येथील मोडीतर तापशी नदीवर थेट सेतुच उभा राहिला.शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी पूर्ण सहकार्य केल्याने सुमारे ४२ गावांचा पावसाळ्यापूर्वीचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे.चार तालुक्यांना थेट जोडणारा हा सेतू ग्रामस्थ प्रवाशी आणि पर्यटकांना जवळचा मार्ग ठरणार आहे.
चिपळूण तालुक्याचा दक्षिण भाग म्हणजे घनदाट जंगले,मनमुराद निसर्गाचा आनंद देणारा परिसर असला तरी येथे दळणवळणाची सुविधा फार तुरळक आहे.परंतु येथील तोंडलीचे सुपुत्र आणि शिवसेनेचे आक्रमक तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी या परिसराचा विकास हेच एकमेव ध्येय समोर ठेवून प्रयत्न सुरू केले असून त्यांना यश देखील येत आहे.तोंडली ते गुहागर तालुक्यातील शिवणे यादरम्यान असलेल्या तापशी नदीवर पूल झाल्यास ४ तालुके थेट जोडले जातील व पर्यटक व्यवसायाला चालना मिळणार असल्याने येथे १०० मीटर लांबीचा पूल देखील मंजूर करण्यात येणार आहे. परंतु तो पर्यंत येथील ४२ गावांची गैरसोय होऊ नये.दळणवळण सोपे व्हावे म्हणून ग्रामस्थांनी तापशी नदीवर सेतू (फरशी)बांधण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी पूर्ण पाठिंबा देत कामाला देखील सुरुवात केली.जेसीबी,डंपर,ट्रॅक्टर ही सर्व यंत्रणा संदीप सावंत यांनी स्वतः उपलब्ध करून दिली.तर ग्रामस्थांनी श्रमदान व वर्गणी गोळा करून हे काम पूर्णत्वास नेले आहे.मुरलीधर सावंत यांनी स्वतः देखरेख करून कामगारांच्या जेवण नाश्त्याची पूर्ण व्यवस्था केली.तसेच सरपंच मेघ सावंत,रघुनाथ सावंत,सतीश सावंत,महेश सावंत,वाय्.टी. सावंत,गाव प्रमुख(खोत) विलास सावंत ,दिपक सावंत,विठोबा सावंत,विश्वनाथ सावंत,महादेव कांबळे,प्रदीप सावंत,अजय सावंत,अशोक सावंत,समीर सावंत,दत्ताराम सावंत,प्रभाकर सावंत,अजय सावंत, सचिन सावंत शिवणे गावाचे डॉ. निमकर (अशोरे)यांचे सहकारी राजेंद्र लांजेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी एकजूट दाखवत तोंडली- शिवणे असा सेतू तयार करत दळणवळणाचा मार्ग मोकळा केला आहे.