पवारसाखरी येथे भूसुरुंगामुळे घरांना तडे; काम बंद करण्याची ग्रामस्थांनची मागणी ….

0
475
बातम्या शेअर करा

गुहागर -गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथे मोठ्या प्रमाणात भुसुरुंग करून भूस्खलन सुरू असल्याने परिसरातील अनेक घरांना तडा जाऊन घरे कोणत्याही वेळी कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येथे सुरू असलेल्या भुसुरुंग थांबवण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथे एलनटी प्रकल्पाच्या जेटीसाठी लागणाऱ्या विशेष दगडाचे खोदकामाचे काम सुरू आहे. या ठिकाणी गेल्या वर्षभरापूर्वी शासनाने ही परवानगी दिली होती सद्यपरिस्थितीत खोदकाम करण्याच्या परवानगीचा अवधी संपून गेलेला असताना त्या आदेशाची पायमल्ली करत येथे मोठ्या प्रमाणात भूसुरुंग केला जात आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक घरांना तडा जाऊन या येथील घरांना हानी पोहोचली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत येथील ग्रामपंचायतीने बालाजी इन्फोटेक अँड कंपनीला हे भूसुरुंग त्वरित थांबवावे असे लेखीआदेश दिलेले असताना सुद्धा कंपनीने त्या ग्रामपंचायतीच्या पत्राची कोणतीही दखल न घेता भूसुरुंग अद्यापही सुरूच ठेवल्याने येथील नागरिकांमध्ये कमालीचा संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. येत्या दोन दिवसात खनिकर्म विभाग ,रत्नागिरी जिल्हाधिकारी रत्नागिरी ,यांच्यामार्फत येथे कोणतीही कारवाई झाली नाही येथील नागरिक आमरण उपोषण करणार असल्याचे कळते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here