गुहागर – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदी साहिल आरेकर गेली दोन वर्षे कार्यरत आहेत
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्ह्यात उत्तम संघटन गेली दोन वर्षे केली तसेच शैक्षणिक , क्रीडा, सामाजिक, आरोग्य असे उपक्रम त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी मध्ये राबविले .विशेष म्हणजे 2019 ला गुहागर मध्ये राजकीय भूकंप झाला विद्यमान आमदार पक्ष सोडून गेल्या नंतर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना मात्र जशीच्या तशी पक्षात सक्रिय राहिली आणि त्यानंतर गुहागर मध्ये साहिल आरेकर यांनी युवक आणि विद्यार्थ्यांचे संघटन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये केल्याचे दिसते या सर्व कामगिरीमुळे आज पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हाची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदाची संधी दिली आहे.