ताऊक्ते’ चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी

0
556
बातम्या शेअर करा

रत्नागिरी -दिनांक 16 ते 17 मे, 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. सदर कालावधीत वाऱ्याचा वेग खुप जास्त असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
▪️ मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू जये.
▪️ मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होवू नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
▪️ आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. घराच्या बाहेर पडू नये.
▪️ आपले घरमोकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
▪️ घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तू विजेचा खांब किंवा तारा, झाडे इ.पडण्याची शक्यता असल्यास लांब राहावे.
▪️ आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे
▪️ आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदील) बैटरी, ग्यासबत्ती, स्टोव्ह, काडेपेटी या वस्तु उजेड व खाद्य पदार्थ बनविण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
▪️ हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बैटऱ्या जवळ ठेवाव्यात.
▪️ सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
▪️ पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.
▪️ अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
▪️ ग्रामकृती दलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात
▪️ सद्यस्थितीत जिल्हयात Home Quarantine असलेते नागरीक व चक्रीवादळाचे पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना एकमेकांत मिसळणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
▪️ आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.
▪️ मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसीलदार कार्यालय / जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352-226248,222233 वर संपर्क साधावा किंवा 7057222233 नंबरवर व्हॉट्सॲप करावे, असे जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी कडून कळविण्यात आले आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here