गुहागर; उमराठ ग्रामपंचायतीतर्फे सरपंच आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

0
171
बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर, उपसरपंच सुरज अरुण घाडे व सदस्य यांनी उमराठ गावातील ग्रामस्थांच्या समस्या,विकासकामे, शासकीय योजना, महिला बचत गटात सक्रीय सहभाग, सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा परिचय होणे, विकास कामे , गावातील समस्या व सोयी-सुविधांचा अभाव आदीबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे,ग्रामस्थांशी चर्चा करणे व मार्गदर्शन करणे ,आपला गाव आदर्श गाव ही संकल्पना पूर्ण करणे आदी कामांबाबतच्या हेतूने “सरपंच आपल्या दारी” हा उपक्रम उमराठ गावातील दहा वाड्यांमध्ये दहा दिवसात राबविणार आहे.
उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायतीतर्फे उमराठ गावात “सरपंच आपल्या दारी “या उपक्रमांतर्गत उमराठबुद्रुक व उमराठखुर्द या दोन महसूल गावातील तीन प्रभागातील दहा वाड्यांमध्ये वाडी भेट सदिच्छा कार्यक्रम नियोजित केला आहे.मंगळवार दिनांक २ मार्च २०२१ ते सोमवार दिनांक १५ मार्च २०२१ असे दहा दिवस (काही दिवस वगळून ) उमराठ गावातील प्रत्येक वाडीत सदिच्छा भेटीतून “सरपंच आपल्या दारी” हा उपक्रम राबविला जाणार आहे. मंगळवारी २ मार्च २०२१रोजी मराठवाडी ,३ मार्चला घाडेवाडी, ४ मार्चला गोरिवलेवाडी , ५ मार्च रोजी धारवाडी, ६ मार्चला धनावडेवाडी , ७ मार्चला बौद्धवाडी , ८ मार्च रोजी जालगावकरवाडी , १० मार्च रोजी आंबेकरवाडी व १५ मार्च रोजी डागवाडी व कोंंडवीवाडी असा सदिच्छा वाडीभेटीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच व सदस्य यांचा परिचय करून देणे , वाडीतील व्यक्तींशी सुसंवाद साधणे , वाडीची भौगोलिक परिस्थिती जाणून घेणे , वाडीतील सोयी-सुविधांची माहिती घेणे , विकास कामांची माहिती घेणे , ग्रामस्थांच्या विकास कामांबाबत सूचना स्वीकारणे , ग्रामस्थांच्या गैरसोयी व अडचणी जाणून घेणे , गावाच्या विकास कामांबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे , शासकीय योजनांची ग्रामस्थांना माहिती देणे , शासकीय योजना राबविण्याबाबत मार्गदर्शन करणे , शैक्षणिक , आरोग्य व स्वच्छताविषयी मार्गदर्शन करणे , शेती , पशुपालन फलोत्पादन याविषयी माहिती देऊन स्वावलंबी होण्याबाबत मार्गदर्शन करणे , बेरोजगारांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करणे , क्रीडा व हस्तकौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन करणे , महिला बचत गटाचे महत्व पटवून देऊन महिलांना बचत गटात सक्रिय सहभागाबाबत प्रोत्साहन देणे व सक्षम बनविणे , ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांतून लघुउद्योग निर्माण करणेबाबत मार्गदर्शन करणे व सूचना स्वीकारणे , ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाड्यांमध्ये मूलभूत गरजा व सोयीसुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न करुन “आपला गाव आदर्श गाव” ही संकल्पना पूर्ण करणे, “आमचा गाव आमचा विकास ” या शासनाच्या घोषवाक्यानुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील वाड्या सक्षम व समृद्ध होणेबाबत मार्गदर्शन करणे व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे असे हेतु व उद्दिष्ट “सरपंच आपल्या दारी “या उपक्रमाचे आहेत अशी माहिती सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.सदर नियोजित उपक्रमात ग्रामस्थांनी सक्रिय सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here