गुहागर ; आगारप्रमुख मस्त तर कर्मचारी त्रस्त …..जवळपास 41 फेऱ्या मनमानी कारभारामुळे बंद लांब पल्ल्याची वाहतूक पंधरा दिवसांपासून ठप्प

0
968
बातम्या शेअर करा

गुहागर -(विशेष प्रतिनिधी ) – कोरोनाच्या महामारीनंतर राज्यात सर्व सेवा सुरळीत करून सर्वत्र अनलॉक होत असताना मात्र गुहागर आगारातील आगारप्रमुख यांच्या मनमानी कारभारामुळे गुहागर डेपो मात्र सध्या अनलॉक असल्याचे दिसत आहे या डेपोतून मिरज ,अक्कलकोट ,कोल्हापूर या लांब पल्याच्या एसटी सह जवळपास 41 एसटीच्या बंद असल्याने सरकार भीक मागू देईना आणि आगारप्रमुख हाताला काम देईनात अशीच अवस्था या ठिकाणी दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच गुहागर हे निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र येथील गुहागर आगारातून नित्यनियमाने जवळपास दीडशे एसटीच्या फेऱ्या नेहमी चालू असतात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून आगार प्रमुख यांची मनमानी कर्मचाऱ्यांना वेळेवर न मिळणारा पगार कर्मचाऱ्यांना बरोबर केलेली जात असलेली दुपठ्ठी वागणूक यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होईल आणि कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण होईल अशा 41 फेऱ्या एसटीच्या फेऱ्या आगारप्रमुख आणि स्थानक प्रमुखांनी जाणून-बुजून बंद केल्याचे बोलले जात आहे. या गुहागर आगारातील अनेक कर्मचारी हे कराड, सातारा ,सांगली, आटपाडी पंढरपूर ,सोलापूर या परिसरात राहणारे आहेत. मात्र या परिसरातील जे चालक आणि वाहक आहेत. यांची आर्थिक अडचण व्हावी या दृष्टीने आगार प्रमुखांनी गुहागर आगारातून नित्यनियमाने सुटणाऱ्या गुहागर -मिरज ,गुहागर- अक्कलकोट, गुहागर -कोल्हापूर या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या आहेत. तर या गाड्यांनसह जवळपास 41 एसटीच्या फेऱ्या या बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी एसटीच्या उत्पन्नात घट होत आहे मात्र ज्या गाड्यांना भारमान नाही अशा मुंबईत जाणाऱ्या गाड्या सुरु ठेवण्यात आगारप्रमुख आणि स्थानिक प्रमुखांनी धन्यता मानली आहे.

एकीकडे राज्यशासन अनलॉक करून सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना आगारप्रमुख मात्र स्थानक प्रमुखांना हाताशी धरून येथील कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त केले जात आहे. गेले तीन महिने एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार नाहीये कारण काय तर एसटीला उत्पन्न मिळत नाही. मात्र एकीकडे गुहागर आगार जे उत्पन्नात आघाडीवर असताना जाणून-बुजून या फेर्‍या बंद केल्या असून आगाराचे उत्पन्न बुडवण्याचे काम हे स्थानक प्रमुख व आगारप्रमुख करत असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. त्यामुळे सध्या गुहागर आगराला तोटा सहन करावा लागत आहे. तर खासगी आरामबस यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here