बातम्या शेअर करा

खेड – कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त तडाखा हा खेड तालुक्याला बसला. मुसळधार पावसामुळे रसाळगड, आणि पन्हाळजे रस्त्यांवर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद झाली. असुन सोसाट्याच्या वाऱ्याने ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला.
खेड तालुक्यातील अनेक गाव कालची रात्र अंधारात काढावी लागली. पावसामुळे कापणीला आलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेत कापून वाळण्यासाठी ठेवले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कापलेल्या शेताचे तळे झाले आणि पूर्ण पीक शेतात तरंगू लागले.

आकाशात अचानक ढगांची गर्दी झाली आणि बघता बघता ढगफुटीसारखा पाऊस पडू लागला. सुमारे दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची सारी गणितं विस्कटून गेली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे दोन तास अक्षरशा ढगफुटी झाल्यासारखे वाटले. या दरम्यान आकाशात विजेचा कडकडाट नव्हता हीच काहीशी दिलासायक बाब होती. दोन तासानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला मात्र या दोन तासात निसर्गाचा तडाखा म्हणजे काय असतो याची प्रचिती आली.
जोरदार पावसामुळे खेड रसाळगड मार्गावर दरड कोसळल्याने या मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला त्याच प्रमाणे खाडीपट्ट्यातील पन्हाळजे येथे रस्त्यावर दरड आल्याने हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद झाला. अन्य काही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरही दगड येणे, झाड कोसळणे अश्या घटना घडल्या. खंडित झालेल्या वीजपुरवठा सुरळीत कारण्यासाठी काल रात्रभर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. आज दुपारी अखेर या प्रयत्नांना यश आले आणि तालुक्यातील बहुतांशी गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here