गुहागर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने चालणारा पक्ष आहे. व पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर ह्यांच्या मार्गदर्शाखाली चालणारा पक्ष असून सर्वसामान्य आणि तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पक्षाची कार्यकारिणी व कार्य उत्तम रित्या चाललेली असून पक्षात काही स्वार्थी लोकांनी पक्षात येऊन पक्षाला बदनाम करण्याचे कृत्य करत आहेत. अशांना पक्षातून हाकलून लावावे असे प्रतिपादन मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर ह्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मनसे पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्ष नेहमीच लोकोपयोगी कामे करण्याचा प्रयत्न करत आला आहे. मोठ- मोठे आंदोलने ही पक्षाने केली आणि ह्याचाच फायदा घेऊन सध्या पक्षात संधीसाधू व स्वार्थी लोकांनी पक्षात येऊन पक्षाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करून स्वतःचे अनैतिक आणि अवैधरित्या कृत्य करण्यास सुरुवात केली आहे, अशा बदमाश लोकांना पक्षातून हकालपट्टी करावी असे प्रतिपादन मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर व. मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर ह्यांनी केले होते. ते अतिशय योग्य असून मी स्वतः व संपूर्ण गुहागर मधील महाराष्ट्र सैनिक हे त्यांच्या मताशी सहमत आहोत असेही विनोद जानवळकर म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते सहसंपर्क अध्यक्ष नितीन कारकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बोगस ई-पास प्रकरणात गुहागर तालुक्यातील मनसेचा कार्यकर्ता अटक झाल्याने पक्षाची नाहक बदनामी झाली आहे. राकेश सुर्वे हा डोंबिवली येथे पक्षाचा कार्य करत होता. मात्र तो मूळचा गुहागर तालुक्यातील पडवे गावचा रहिवासी आहे. आणि त्याला गुहागर तालुक्यातील पडवे गावातूनच नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.