बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील अंजनवेल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी गेलेली श्री गणेश कृपा या मच्छिमारी बोटी ला खवळलेल्या समुद्रामध्ये जलसमाधी मिळाली आहे. सदर बोटीवरील 8 जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.

गुहागर तालुक्यातील धोपावेतील ज्ञानेश्वर भोरजी यांच्या मालकीची ती बोट होती. ती अंजनवेल येथून आठ खलाशांना घेऊन मच्छिमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेली असता अंजनवेल येथील लाईट हाऊस समोरील भागात समुद्रातील भागात गेली असता यामध्येच लाटांचे पाणी बोटीमध्ये शिरल्याने बोटीतील इंजिन बंद पडले बंद पडलेल्या इंजिनमुळे बोटीला जलसमाधी मिळाली. यावेळी बोटीवरील आठ जणांनी बोटीतील मिळेल त्या साहित्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील सहा जणांनी पोहत पोहत किनारा गाठला. दोघेजण बोटीच्या फळीच्या साह्याने समुद्रामध्ये पोहत राहिले. अशावेळी मच्छीमारीसाठी गेलेल्या दुसऱ्या गोष्टीतील खलाशांच्या संपर्क साधण्यात आला. त्या बोटीच्या साह्याने समुद्रामध्ये पोहत असलेल्या दोघांना वाचवण्यात आले.

बोटीतील वाचलेले मालक ज्ञानेश्वर भोरजी, राजेश भोरजी , उदय दाभोळकर, रोहिदास भोरजी, जयदास भाटकर, तुकाराम पालशेतकर, जगन्नाथ पवार, प्रणित दाभोळकर हे सुखरूप किनाऱ्यावर परतल्या आहेत. सुमारे 25 लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here