कणकवली – गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही. असा निर्णय आज 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सिंधुदुर्गातील 25 गावांच्या सरपंचाची बैठक आज पार पडली.
सिंधुदुर्गा जिल्ह्यातील खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे.कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन होणं अनिवार्य असेल. तरच बाजारात प्रवेश देण्यात येईल, असा एकमुखी निर्णय सरपंचाच्या या बैठकीत घेण्यात आला.