गुहागर – गुहागर तालुक्यातील जानवळे येथील म्हादलेकर कुटुंबातील अंकीत आणि अक्षय या दोघा जुळ्या भावांनी आपले बालपणापासूनचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण केले असून त्यांच्या या जिद्दीचे व यशाचे ग्रामस्थांनी मिरवणूक काढून त्यांचे विशेष कौतुक केले.
अंकीत आणि अक्षय या दोघांचंही स्वप्न होतं पोलीस बनण्याचं. अंकीत शालेय शिक्षणात एक वर्ष आजारी असल्यामुळे त्याला परीक्षा देता आली नाही म्हणून तो एक वर्ष अक्षयच्या मागे राहिला. अंकितच्या आधी अक्षयने पोलीस भरतीची सुरुवात केली. घरची आर्थिक स्थिती पाहून अंकित ने एक पाऊल मागे घेतले आणि घर चालवण्यासाठी व अक्षयच्या पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी आई सोबत स्वतःवर घेतली. त्यानंतर अक्षय सलग 7–8 वर्षे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत राहिला, आणि त्याचा पूर्ण खर्च आई बरोबर अंकितने उचलला. शेवटी दोन्ही भावांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं अक्षय पोलीस झाला, आणि अंकित त्याचा खंबीर आधार स्तंभ ठरला. अंकितचे अक्षयला पोलीस भरती होण्यापूर्वीचे शब्द असे होते “तू जिद्द हरू नकोस. तुला लागणारा जितका खर्च आहे, तो मी करेन. घराची आणि तुझ्या खर्चाची जबाबदारी आई सोबत माझ्यावर आहे, त्यामुळे खचून जाऊ नकोस. कितीही वर्षे लागली तरी चालतील, पण तुला पोलीस व्हायचंच आहे.” अक्षय पोलीस झाल्यानंतर अंकित पुन्हा एकदा त्याने अक्षयला सांगितले मला फक्त एक वर्ष द्या, मी पोलीस होऊन दाखवेन यावेळी घराची आणि अंकितची जबाबदारी अक्षयने स्वीकारली. अंकितने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावातील वर्षभराचे सण-उत्सव बाजूला ठेवून पोलीस भरतीसाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न केले. त्याची मेहनत वाया गेली नाही, आणि अखेर तो दिवस उजाडला अंकितही पोलीस झाला. अंकितने फक्त एक वर्ष जोरदार प्रयत्न केले आणि वयाच्या ३० व्या वर्षी पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. अक्षय आणि संकेत यांची पोलीस भरतीची कहाणी सुंदर आहेच; पण अंकितची कहाणी अविस्मरणीय आहे. कारण तो कधीच हरला नाही. त्याने फक्त आपल्या भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल मागे घेतलं, आणि जेव्हा भावाचं स्वप्न पूर्ण झालं, तेव्हा त्याने स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार पावलं पुढे टाकली. या प्रसंगातून एकच संदेश जातो मनुष्याने आपल्या स्वप्नांसाठी कधीही हार मानू नये. हेच खरे
















